HW News Marathi
महाराष्ट्र

भिमाकोरेगाव हिंसाचाराची साक्षिदार पूजा सकट हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी

पुणे | भिमाकोरेगाव हिंसाचाराची साक्षिदार पूजा सकट हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. एफ. आय .आर मध्ये नोंद असलेल्या 7 आरोपींना तात्काळ अटक करा. या प्रकरणी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली.

आज भिमाकोरेगाव जवळ मौजे वाडी येथील पुनर्वसन वसाहत येथे दिवंगत पूजा सकटच्या कुटुंबियांची रामदास आठवलेंनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शोकाकुल सकट कुटुंबीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रकरणाची आणि एकूण तपासाची माहिती घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संथगतीने तपास चालविला असल्याचे लक्ष्यात आल्याने रामदास आठवलेंनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास वेगाने करून पूजा सकटच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

पूजा सकट हिचा गूढ मृत्यू झाला असल्याची नोंद असून याबाबत पोस्ट मार्टेम अहवाल आल्यानंतर पूजा सकट यांची आत्महत्या की हत्या झाली हे स्पष्ट होईल .मात्र कुटुंबियांच्या आरोपानुसार पूजा सकटला धमक्यांचे फोन येत होते.ती 11 वीची विद्यार्थिनी होती. मारेकऱ्यांनी तिची हत्या केली असून त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. या मागणीसाठी आपण एसपिंशी बोललो आहोत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

पूजा सकट मृत्यूप्रकरणी ऍट्रोसिटी गुन्हा दाखल झाला असून सकट कुटुंबियांना शासनातर्फे 8 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. रिपाइंतर्फे 1 लाख रुपये सांत्वनपर मदत सकट कुटुंबियांना देण्यात आले आहेत. तसेच भिमाकोरेगाव येथील सकट कुटुंबियांसह एकूण 3 दहशतग्रस्त कुटुंबियांचे पुणे शहरात शासनातर्फे पुनर्वसन करण्यात येणार आहे.त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

भिमाकोरेगाव येथील दंगलीत दलितांच्या वस्तीचे 8 कोटीहुन अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार येथील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आठवले म्हणाले.

ऍट्रोसीटीचा गुन्हा डी. वाय. एस पीद्वारे तपासून गुन्हा दाखल करण्यात येतो मात्र ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींकडून फिर्यादी दलितांवर चोरीचा 395 चा खोटा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे ऍट्रोसिटीतील आरोपी दोनतीन दिवसांत जामिनावर सुटतात मात्र 395 च्या खोट्या गुन्ह्यातील आरोपी महिनाभर जामीना अभावी जेल मध्ये अडकून पडतात. हे रोखले पाहिजे त्यासाठी कलम 395 चे खोटे गुन्हे नोंदवीनाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जसे ऍट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करताना त्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासला जातो त्याप्रमाणे ऍट्रोसिटी दाखल झाल्यानंतर सवर्णांकडून दलितांवर 395 चा गुन्हा दाखल करताना तो तपासला जावा. खोटा गुन्हा दाखल होत कामा नये अन्यथा दलितांनीही ऍट्रोसिटीचा गुन्हा नोंदविताना 395 नुसार ही गुन्हा नोंदविला पाहिजे असे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांना प्रधानमंत्री होण्याची ईच्छा असली तरी आणखी 20 वर्ष त्यांना प्रधानमंत्री होता येणार नाही. आगामी सन 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीएचा विजय होईल आणि नरेंद मोदीच प्रधानमंत्री होतील असा विश्वास केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

ऍट्रोसीटी कायद्याच्या बाजूने सरकार आहे. ऍट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. ऍट्रोसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्रसरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.यासोबत आरपीआय ने ही पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वटहुकूम काढून सरकार ऍट्रोसीटी कायद्याचे संरक्षण करणार आहे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

 

येत्या 27 मे रोजी पुण्यातील एस एस पी एम एस मैदान आरटीओ जवळ रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनास उपस्थित राहतील. रिपाइंसोबत बहुसंख्यांक समाज असून या अधिवेशनात रिपाइंचे शक्तीप्रदर्शन घडविणार समाज तोडणाऱ्या विचारांना रोखण्यासाठी समाज जोडण्याचा कार्यक्रम या अधिवेशनातून देण्यात येणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या खुल्या पत्रातील संकल्पनेनुसार व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याची भूमिका या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. दलित मराठा ऐक्य घडविण्यासाठी रिपाइं च्या राज्यस्तरीय अधिवेशनातून प्रयत्न करण्यात येणार आहे.अशी माहिती आठवलेंनी यावेळी दिली.

यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते एम डी शेवाळे, काकासाहेब खंबाळकर, डी एम चव्हाण, परशुराम वाडेकर, हनुमंत साठे;मंदार जोशी, आसित गांगुर्डे, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, चांद्रकांता सोनकांबळे, शशिकला वाघमारे, प्रियदर्शिनी निकाळजे, महावीर सोनवणे, हेमंत रणपिसे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास

News Desk

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk

समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा

News Desk