HW News Marathi
महाराष्ट्र

बळीराजा आजपासून १० दिवसीय संप

मुंबई : देशाच्या २२ राज्यातील शेतकऱ्यांनी १० दिवसीय संप पुकारला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने राज्यभरातील शेतकऱ्यांनी आजपासून १० जूनपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपा दरम्यान बळीराजा आपला कोणताही शेत माल विक्रीसाठी काढणार नाही.

शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून संपाला सुरुवात केली. तर पुणे-बंगलोर महामार्गावर राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रात्री शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून दूध रसत्यावर सोडून दिले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाची नदी वाहत असल्याचे चित्र दिसू लागले होते.

या संपात २२ राज्यातील १२८ शहरामधील महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. संपाच्या काळात शेतकरी आपला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरांमध्ये विक्रीस पाठविणार नाहीत. आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी देखील करणार नाहीत.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे, अशी माहिती जनआंदोलनाचे अॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सेवानिवृत्तीनंतरही मुख्य सचिवासाठी राखीव बंगल्याचा मोह स्वाधीन क्षत्रियांस सुटेना 

News Desk

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

Aprna

ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही !

swarit
राजकारण

हा तर भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

News Desk

मुंबई | पालघर लोकसभा पोट निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. परंतु पालघर मधील सेनेचा पराभव नसून हा तर भाजपचा पराभव असल्याचे दावा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पालघरमधील पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही वेळेतच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपवर ताशेरे ओडले.

चिंतामण वणगा यांच्या कुंटुबियांना न्याय मिळवण्यासाठी सेनेने पालघर निवडणूक लढवली असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेना आगामी निवडणुकीत युती करणार नसून स्वळावर सर्व निवडणुका लढवणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. साम-दाम-दंड-भेट या कुट नीतीचा अवलंब करुन अखेर भाजपला पालघर लोकसभा पोट निवडणुकीत विजयी मिळाला.

शिवाजी महाराजांचा अपमान

उत्तर प्रदेशातील फुणपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या पोट निवडणुकीत मुख्यमंत्री योगी यांचा पराभव झाला होता. परंतु भाजपने पालघरमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी योगींना बोलवले. योगीनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महराज यांचा अपमान केला तरी देखील फडणवीस सरकारला या बदल काहीच वाटले नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी योगींवर टीका केली.

निवडणूक आयोग बुजगावणं

पालघर पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रातील ईव्हीम मशीन बंद पडल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पालघर निवडणुकीच्या वेळी भाजपने त्यांच्या उमेदवार जिंकण्यासाठी पैसे वाट केल्याचा प्रकार केला होता. हा सर्व प्रकार सेनेने उघडकीस आणून पैसे वाटप करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या हवाले केले होते. पण, पैसे वाटप करणाऱ्यांवर लोकांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप ठाकरेंनी निवडणुक आयोगावर केली.

तसेच मुख्य निवडणूक आयोगाच्या पदासाठी निवडणूक व्हावी, निवडणूक आयोगावर नियंत्रण राहिलेले नाही तसेच निवडणुक आयोग हे फक्त दगडासारखे आहे. निवडणूक आयोग हे भ्रष्ट्राचारी असल्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुक आयोगा विरोधात कठोर निर्णय घेणे गरजचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

Related posts

नेत्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बदल्या !

News Desk

आम्ही आधी मुलांना घेतले अन् वडील आपोआप आले !

News Desk

फेसबुकचे १५ हजार लाइक्स मिळवून देणार विधानसभेचे तिकीट ?

News Desk