HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी, भाजपच्या माजी आमदाराला मारहाण

बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या गंभीर वक्तव्याचा निषेध करणं भाजप नेत्यांना चांगलंच भोवलं आहे. गायकवाड यांचा पुतळा जाळताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपच्या माजी आमदाराच्या डोळ्याला खुप मार लागला आहे. सदर घटनेमुळे बुलडाण्यात तणाव निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी आणि गंभीर टीका केली होती. यावेळी गायकवाड यांचा तोल सुटला होता. त्यामुळे भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काल १८ एप्रिलला जयस्तंभ चौकात येऊन गायकवाड यांचा निषेध नोंदवला होता. यावेळी त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांनी त्याला विरोध केला.

कुणाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केल्याने दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडून प्रकरण हमरीतुमरीवर आलं. ही शाब्दिक चकमक अधिकच वाढली आणि प्रकरण हाणामारीवर आलं होतं. दोन्ही गटांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या डोळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा डोळा सुजला.

फडणवीसांवर आणि भाजपवर टिका करताना संजय गायकवाड काय म्हणाले होते?

यावेळी बोलताना म्हणाले की ,भाजपच्या लोकांचे नीच राजकारण महाराष्ट्र उभ्या डोळ्याने पाहतोय,देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील. हा कोरोना कोण कोणत्या पक्षाचा आहे,हा कोरोना राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे का हे पाहुन येत नाही, तर हा कोरोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला वीळखा घालत आहे. भाजपाने हे विसरु नये त्यांच्या १०५ आमदाराना देखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले आहे, त्यांचे २० खासदार देखील महाराष्ट्राने निवडून दिले आहे, अशावेळी केंद्रांकडून राज्यातील वॅक्सीन कंपन्यांना सांगितलं जात की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडिसिवर देऊ नका. राज्याने ऑक्सीजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही. ५०,००० इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिल्या जातात.

महाराष्ट्रात लोक तडफडतात, अशा प्रकारचे नीच आणि गली गलिच्छ राजकारण भाजपा सरकार करत आहे, हे या जगामध्ये,या देशामध्ये कोणीच केल नाही. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळल दयायला वॅक्सीन आहे, इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का ? की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे का,? अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीसांना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता. मला जर कोरोनाचे जंतु सापडले असते तर मी त्या फडणवीसांच्या तोंडात जावून कोंबले असते,असे गायकवाड म्हणाले.

पुढे ते असही म्हणाले की, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, आणि म्हणून ह्या लोकांनी राजकारण न करता लोकांना मदत करावी.पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे,माणूस जगला पाहिजे नंतर तुमचे राजकारण आहे. अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, कोण मतदान करेल तुम्हाला, हे लक्षात घ्या आणि नंतर तुमचे गलिच्छ राजकारण करा…अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk

सत्तेची मस्ती अधिक काळ टिकत नाही हे पंतप्रधान मोदींनी विसरु नये -सुशीलकुमार शिंदे

News Desk

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर 

News Desk