HW News Marathi
महाराष्ट्र

‘रात्रीस खेळ चाले’मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय?

मुंबई | ‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय?, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. ‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परीक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय”… म्हणून आठवण करुन देतो, विद्यार्थी हित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा!’ असे ट्वीट आशिष शेलारांनी उदय सामंत यांनी चिमटा काढला आहे.

याआधीही आशिष शेलार हे वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकारवर टीका करत आहे. “आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी, आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (१ जून) पत्र लिहिले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर आक्षेपार्ह उल्लेख

News Desk

आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार! – उद्योग मंत्री उदय सामंत

Aprna

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

News Desk