HW News Marathi
महाराष्ट्र

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही!

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये म्हणजेच खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा पराभव झालाय. हा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच भाजपसाठीही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मात्र पाटील यांनी हा पराभव म्हणजे आपला पराभव असल्याचा दावा फेटाळू लावला आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी पहिली प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अगदी थोड्या मतांनी आम्ही खानापूरमध्ये पराभूत झाल्याचे म्हटले आहे. तसचे पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नसून महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे,” असंही म्हटलं आहे.

खानापूरमध्ये सहापैकी तीन जागा आम्हीच जिंकल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. दोन जागांवर आमचा अगदी कमी मतांनी पराभव झाल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पराभव झाला असला तरी आम्हाला गावातील जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सरकार हे तीन पक्षांचं कडबोळं सत्तेत आहे. मी सुरुवातीपासून चारही पक्षांनी स्वबळावर लढावं, मग पाहा आण्ही नंबर वनला असू असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केलाय. तसेच राज्यातील सध्याच्या सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही असा टोलाही त्यांनी लगावाल आहे. ग्रामपंचायतीत जिंकल्याने जिकलो असं होतं नाही. एखाद्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आल्यानंतर ती ग्रामपंचायत जिंकल्याचं म्हटलं जातं. संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीचं चित्र अधिक स्पष्ट होईल तेव्हा आमचीच संख्या जास्त असेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna

आषाठी वारीसाठी १० मानाच्या पालख्यांना परवानगी, अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

News Desk

गृहमंत्री घेणार बैलगाडा मालकांवरील गुन्हे घेणार मागे…

News Desk