HW News Marathi
Covid-19

परीक्षा न देता जो माणूस मुख्यमंत्री झाला, ‘त्या’ माणसाने निर्णय घेणे काही नवल नाही !

मुंबई | परीक्षा न देता जो माणूस मुख्यमंत्री झाला त्या माणसाने हा निर्णय घेणे काही नवल नाही, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचे ठरवले असल्याचे मुख्यमंत्री काल (३१ मे) फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना स्पष्ट केले.

निलेश राणेंनी एका वृत्त वाहिनी बातमीला रिट्वीट करत म्हणाले, परीक्षा न देता जो माणूस मुख्यमंत्री झाला त्या माणसाने हा निर्णय घेणे काही नवल नाही, अशी टीका त्यांनी केली. तर मुख्यमंत्री काल राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हणाले, “तातडीने परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापूर्वी- जेवढे सेमिस्टर झाले आहेत त्याची सरासरी काढून गुण देऊन त्यांना उत्तीर्ण करायचे ठरवले आहे,” असे ते म्हणाले

संबंधित बातम्या

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार | मुख्यमंत्री

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री साहेब, सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” नववर्षाच्या मुहूर्तावर ‘मनसे’चा बोचरा सवाल 

News Desk

“निलेश राणे लवकर बरे व्हा”, रोहित पवारांनी दिल्या सदिच्छा

swarit

देशात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पार !

News Desk