HW News Marathi
महाराष्ट्र

शेलारांच्या ‘त्या’ व्यक्तव्यामुळे पेडणेकरांनी केली गृहमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबईमधील वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर किशोरी पेडणेकरांवर आक्षेपार्ह टीप्पणी केली आहे. यानंतर महापौरांनी शेलारांविरोधात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

वरळी स्फोटा घटनेत एक कुटुंबातील चार जण गंभीरित्या जखमी झाल्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या स्फोटामध्ये चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात’ असे वक्तव्य केले.” शेलारांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. यावरून आता भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या महिलाआघाडी आमने-सामने आल्या आहेत.

महापौर या मुंबईच्या प्रथम नागरिक असतात. या महत्त्वाच्या पदावरील महिलाबाबत असा शब्दप्रयोग आक्षेपार्ह करणे योग्य नाही. शेलारांच्या या वक्त्याचा मी निषेध करते. शेलारांनी माझा आणि समस्त स्त्री जातीचा अवमान केला असल्यामुळे मी त्यांच्याविधात तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती पेडणेकरांनी प्रसार माध्यमांना केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा सिद्दीकीची ४६२ कोटी संपत्ती जप्त ईडीची कारवाई

News Desk

यावर आता काय बोलयाचे, यात काही नवीन नाही! – शरद पवार

Aprna

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही! – उपमुख्यमंत्री

Aprna