HW News Marathi
Covid-19

भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचे कौतुक, दिली शाबासकीची थाप

मुंबई । महाराष्ट्रातील आव्हानात्मक कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कौतुक केलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (१ मे) थोड्याच वेळापूर्वी याबाबतचे ट्विट केले आहे. “राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावल्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकीची थाप मिळायला हवी. मला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत.”

“महाराष्ट्रातील कोरोनास्थिती अशीच पुढेही स्थिरावत गेली तर ठाकरे सरकार शाबासकीची मोठी थाप मिळण्यास पात्र आहे”, असेही पुढे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यात कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कडस निर्बंधांची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील आकडा कमी झाला नसला तरीही तो वाढलेलाही नाही. स्थिरावला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांमध्ये सध्या महाराष्ट्राचा समावेश होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. मात्र, ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्ष वाढवा कोरोना नाही, मुख्यमंत्र्यांची सर्व राजकीय पक्षांना तंबी

News Desk

#Lockdown : तेलंगणा राज्याचा लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवण्यात आला

News Desk

पुण्याच्या महापौरांनी हॉटस्पॉट परिसराचा घेतला आढावा

News Desk