HW News Marathi
महाराष्ट्र

मालपाणी कमवण्याकरता ‘हे’ सर्व लोक एकत्र आले आहेत !

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कांद्री मनसूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत शिवसेनेवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले की, “बेईमानानी आणि विश्वासघाताने बनलेले हे सरकार सहा-आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही. भाजपच सरकार याठिकाणी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आजही मारामारी सुरु आहे. कुणी राजीनामा देत आहे तर कुणी घरी बसतेय तर कुणी ऑफिस फोडतेय. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. गरिब, शेतकऱ्यांशी कुणालाही काहीच घेणेदेणे नाही. केवळ मालपाणी कमवण्याकरता हे सर्व लोक एकत्र आले आहेत. कसा डल्ला मारता येईल? याचा प्रयत्न यांचा सुरू आहे’, असा घणाघात फडणवीसांनी केला.

फडणवीस म्हणाले की, “शिवसेना स्वार्थासाठी कुठेही जाऊ शकते, कुठेही स्थायिक होऊ शकते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने त्यांची बेईमानी वृत्ती दाखवली आहे. बेईमानानी आणि विश्वासघाताने बनलेले हे सरकार सहा-आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही.”

लोकांना बुद्धू बनवणारा जीआर सरकारने काढला

‘कर्जमाफीबाबत लोकांना बुद्धू बनवणारा जीआर सरकारने काढला. जीआरमध्ये सांगितले की, २०१५ ते २०१९ च्या मध्येच कर्ज घेतलेले पाहिजे. कर्ज सप्टेंबर २०१९ पूर्वी थकीत असले पाहिजे. केवळ पीक कर्ज माफ होईल, मुदत कर्ज माफ होणार नाही. अल्प मुदत कर्ज माफ होणार नाही. एकप्रकारे शेतकऱ्याला कर्जमाफीचे आश्वासन देऊन मूर्ख बनवण्याचे काम या लोकांनी केले’, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांबद्दल ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आजच अटक करू, अजित पवारांचं आश्वासन

News Desk

राजकीय वर्तृळातील महत्वाच्या असणाऱ्या पहाटेच्या त्या शपथविधीला आज १ वर्ष पुर्ण

News Desk

अर्णब गोस्वामींसाठी राज्यपालांची गृहमंत्र्यांना सूचना, कुटुंबीयांना भेटू देण्याचे दिले निर्देश

News Desk