HW News Marathi
देश / विदेश

तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव, भाजपचा कॉंग्रेसवर निशाणा 

पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरूवातीला तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मुसंडी मारली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलत गेलं. सध्या एनडीएने मुसंडी मारली आहे. तर महाआघाडीची घसरण होताना दिसत आहे. एनडीए सत्तेत येण्याचे कल येत असतानाच भाजपानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत, डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,” असं म्हणत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी व काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने दाखल केली पुनर्विचार याचिका

News Desk

#Coronavirus : दिलासादायक ! काल एकाच दिवशी ७०५ जण कोरोनामुक्त

News Desk

काळोखात पाप करू नका, काय असेल ‘ते’ उजेडात करा !

News Desk