HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

औरंगाबाद | बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. औरंगाबाद येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला काटावर बहुमत मिळाले आहे. १२५ जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे. असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही – नारायण राणे

News Desk

विरोधकांनी स्वतःचे वजन केंद्र सरकारकडे वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी-अब्दुल सत्तार

News Desk

वाधवान कुटुंबाला प्रवासाची परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांना सक्तीची रजा

News Desk