HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणूकीत ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याचे आशिष शेलारांनी दिले संकेत

मुंबई | बिहार विधानसभा निवडणूकांमध्येभाजपच्या विजयामुळे महाराष्ट्रातही भाजप नेत्यांना बळ मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं काम घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत. मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असून देवेंद्र फडणवीस हे पालिका निवडणुकांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. या आधी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. मात्र, आता ती युती तुटली असून शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी सरकारच्या बंधनात आहेत.

अशिष शेलार यांनी बिहार निवडणुकीतल्या पराभवावरून शिवसेनेला चिमटे काढले आहे. शिवसेनेचा मतदार हा शिवसेनेला महापालिका निवडणुकीत सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही असेच सोबत रहा, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा पराभव करणार हे बिहारच्या आकड्यावरून स्पष्ट होतं अशी टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.

आशिष शेलार यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच बिहार पॅटर्न आता मुंबई महापालिकेत राबवण्याचे संकेतही दिले. शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. महाराष्ट्रातील या आघाडीचे पडसाद बिहारमध्ये उमटले. बिहारी जनतेला काँग्रेसेने शिवसेनेला सोबत घेणं आवडलं नाही. त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये सपाटून मार खावा लागला. तेच आता मुंबईत घडेल. मुंबईकर मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची साथ सोडेल, असा दावा शेलार यांनी केला आहे. तुम्ही महापालिका निवडणुकीतही काँग्रेससोबत राहा. जनता तुमचा निश्चित पराभव करेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महापालिका निवडणूक मुंबई भाजपध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वातच लढवू. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणूक कामाला लागलो असून फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मुंबई महापालिकेसाठीची रणनीती आजच सांगणार नाही, असं सांगून शेलार यांनी मुंबईत परिवर्तन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सरकारची धोरणे शेतकरीविरोधीः खा. अशोक चव्हाण

News Desk

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती

News Desk

अोबीसी महामंडळाने व्याजमुक्त कर्ज योजनेचा प्रस्ताव सादर करा-राम शिंदे

News Desk