HW News Marathi
महाराष्ट्र

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोरेगाव येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये बूथ स्तरीय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या महासंमेलनमध्ये व्यक्त केला. राहुल गांधी पुढे असे देखील म्हटले की, भाजपचा कर्नाटकात पराभव झाला असून गुजरातमध्ये त्यांनी स्वत:ला कसेबसे वाचवले. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही त्यांचा पराभव होईल, असे वक्तव्य राहुल यावेळी बोलत होते.

मोदी सरकार महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांनर काहीच बोलत नाहीत. या तिन्ही समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार आणि ही लढाई आम्ही नक्की जिंकू असा आत्मविश्वास राहुल यांनी यावेळी व्यक्त केला.

जर भाजपला कोणी हरवेल तर फक्त काँग्रेसची विचारधारा हरवू शकते. तसेच काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रक्षण करण्याचे काम माझे आहे. काँग्रेस पार्टी ही नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची पार्टी आहे. जिथे भाजप आणि आरएसएसचे लोक आग लावतील तिथे तिथे जाऊन तुम्ही पाणी टाका आणि ती आग विझवा, असे राहुल यांनी कार्यकर्तांना संबोधित करताना सांगितले.

या महासंमेलनात राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या शक्ती कँम्पेन या प्रोजेक्टचे अनावरण करुन एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. मुंबई ज्याप्रमाणे सर्व वर्गातील लोकांना सामावून घेते. त्याचप्रमाणे काँग्रेस देखील प्रत्येक वर्गातील व्यक्ती सामावून घेते. आणि काँग्रेसमध्ये सर्वजण मिळून काम करतात, मुंबईतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी भाजपचा खरपूस समाचार घेतला. या महासंमेलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, राजू वाघमारे यांच्यासह मुंबतील काँग्रेस नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं ही साधी बाब नाही, म्हणून घातपाताची शक्यता वर्तवली, उर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

News Desk

आता थेट केंद्रीय आरोग्यमंत्रीच म्हणाल्या, ‘उद्धवजी, मंदिरं उघडा!’

News Desk

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतले !

News Desk
राजकारण

नाशिकच्या आदिवांसींना भाजप खासदार म्हणतात मावोवादी

News Desk

मुंबई | नाशिक जिल्ह्यातून मुंबईत धडकलेल्या मोर्चेकऱ्यांबद्दल संवेदना दाखवण्याऐवजी मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. त्या म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत आहे.

यामध्ये सर्व लोक हे लाल झेंडे घेऊन निघाले आहे.’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुनम महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की पुनम महाजन यांना शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पुनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे.

Related posts

शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज एकत्र सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला !

News Desk

सेल्फीचा नाद खुळा

News Desk