HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेसाठी भाजपचा नवा नारा “फिर एक बार शिवशाही सरकार”

मुंबई | विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश मिळविण्यासाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” घोषणा तर “अब की बार २२०” पार हे लक्ष्य ठेवलेआहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यात विकासयात्रा काढणार असून याद्वारे राज्य सरकारने पाच वर्षात केलेल्या विकास कामे सांगून सर्व मतदारसंघ पिंजून काढणार असल्याची माहिती राज्याेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (२३ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे.

भाजपची काल दादर येथील वसंतस्मृती येथील आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असेल, याचा निर्णय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपध्यक्ष अमित शहा हेच घेतील, अशी माहितीही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

विधानसभेसाठी १५ सप्टेंबरला आचारसंहिता?

राज्यात विधानसभेच्या निवडणुका या १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान होऊ शकतात. लोकसभेप्रमाणेच महिनाभर आधी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू शकते. अशी शक्यता भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आतापासूनच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी

News Desk

आमच्या एकजुटीला तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर जरूर म्हणा – मुख्यमंत्री

News Desk

रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांवर नितेश राणेंची टीका

Aprna