HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची, भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | एकीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी थेट रुग्णालयामध्ये जाऊन निर्भिडपणे कर्तव्य बजावताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिकरीने लढा देण्याच्या ऐवजी फेसबुकवर जास्त दिसतात महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची, असे ट्वीट करत भाजपचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नुकतेच उउत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात दोन साधुंची हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ज्या प्रकारे आम्ही पालघर साधूंच्या हत्ये प्रकरच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो, योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण!

News Desk

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk