HW News Marathi
महाराष्ट्र

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : संथ गतीच्या तपासावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडे बोल

मुंबई | ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सुरू मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असलेल्यामुळे न्यायालयाने टीका केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना या प्रकरणासाठी वेळच नाही, अशा शब्दात न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका केली. कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींचा शोध न लागल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत म्हटले की, शेजारील राज्यात वेगळ्या विचारसरणीचे सरकार आहे. म्हणून तिथे विचारवंतांच्या हत्याकांडाला गांभीर्याने घेतले जाते का? असा सवाल करत कर्नाटकातील गौरी लंकेश प्रकरणातील तपासामुळे महाराष्ट्रातील तपासयंत्रणांना इथे घडलेल्या हत्याकांडांचे धागेदोरे मिळतात. यावर हायकोर्टाने तपासयंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेली पाच वर्षे एवढ्या संथगतीने तपास सुरू आहे. परंतु, पोलीस याप्रकरणी कोणालाच दोषी ठरवत नाही, याबाबत स्पष्टीकरणही दिले जात नाही. न्यायालयाने लक्ष घातल्यानंतर दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. समाजात काय संदेश जातोय, याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk

ग्रंथालय सुरु करण्याच्या बाबतीत २ दिवसांत निर्णय घेणार, राज ठाकरेंच्या एका फोनचा इम्पॅक्ट!

News Desk

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

News Desk