HW News Marathi
महाराष्ट्र

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

दारू पिऊन नदीत उतरलेल्या दोघांचा बुडून मृसनगर होळी साजरी करण्यासाठी दारू पिऊन नदीत पोहायला उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये.

उल्हासनगरला राहणारे रवींद्र शिवाप्रसाद कुमार आणि हिरा आहुजा हे त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी अंबरनाथच्या वसार गाव परिसरात आले होते. तिथे मद्यपान करून ते उल्हास नदीत पोहायला उतरले, मात्र मद्यधुंद अवस्थेत त्यांना नदीच्या पात्राचा अंदाज न आल्यानं हे दोघेही नदीत बुडाले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून अंबरनाथ पालिकेच्या छाया हॉस्पिटलमध्ये आणलं, मात्र तोवर या दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यानं या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मित्रांनी केलाय. या घटनेनं अंबरनाथमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पेट्रोलने गाठली शंभरी, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २४१ गुन्हे दाखल

News Desk

अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन का?

News Desk