HW News Marathi
महाराष्ट्र

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव घटनेबाबत राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. परंतु ते झाले नाही. वढू येथील दलित समाजाच्या व्यक्तिच्या समाजाची तोडफोड केल्यानंतर तणाव झाला. त्यात लाखोंचे नुकसान झाले. राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली असती तर संघर्ष टळला असता. भीडे, एकबोटे सारख्या समाजकंटकांनी वादाला खतपाणी घातले. त्यांच्या नावाचा मी उल्लेख करणार नाही, कारण राज्य सरकारने त्यांना दोषी ठरवले आहे. दरम्यान सर्वांना शांतता राखावी, असे आवाहन पवार यांनी केले.

———————————————————————————-

भीमा-कोरेगाव प्रकरणी संसदेत गाजले, महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधी संतप्त

नवी दिल्लीः भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे आज राज्यसभेतही तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीन हिंसाचारात दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी केली गेली. काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांना भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कारवाईची मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, संभाजी राजे, भाजप खासदार अमर साबळे यांनीही या प्रश्नावर राज्यसभेत निषेध केला. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरूच – सामना टीका

News Desk

“तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे”, सुधीर मुनगंटीवारांनी दर्शवली नाराजी

News Desk

धनगर आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या, पक्ष, जातीची लेबले बाजूल ठेवून विचार करायला हवा !

swarit