HW News Marathi
महाराष्ट्र

२० मे पर्यंत शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठी करावे लागणा-या ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीची मुदत मे पर्यंत वाढवण्यात आली असल्याने शेत-यांना दिलासा मिळाला आहे. या मुदत वाढीची माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गतवर्षी राज्य सरकारने जून महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली होती. अत्यंत पारदर्शक आणि खऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणारी ही योजना असेल असेही यावेळी सांगण्यात आले होते. परंतु, त्यानंतर ऑनलाईन अर्जभरताना झालेल्या गोंधळामुळे या योजनेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या गोंधळामुळे किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची निश्चित आकडेवारी सरकार दरबारी उपलब्ध नव्हती. या गोंधळामुळे सरकारवर प्रचंड प्रमाणात टिका देखील झाली होती.

तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात असून शेवटची मुदत १४ एप्रिल होती, ती वाढवून आता १ मे करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मुदत २० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक – उज्वल निकम

News Desk

शरद पवारांच्या कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नाना पटोलेंचं पवारांकडे बोट?

News Desk

रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार, उर्जामंत्र्यांची घोषणा

News Desk