HW News Marathi
महाराष्ट्र

वन विभागाकडून नरभक्षक वाघिणीची शिकार

यवतमाळ | अखेर काल (शुक्रवार) रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आता या वाघिणीचा मृतदेह नागपूरमध्ये पाठवण्यात आला आहे. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १३ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नरभक्षक वाघिणीच्या भीतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामे ठप्प झाली होती. गावातील मजुर मजुरी मिळत नाही म्हणून गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले होते. राळेगाव व पांढरकवडा भागात या नरभक्षक वाघिणीची दहशत सर्वाधिक होती. नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठे प्रयत्न सुरू होते. या शोध मोहिमेसाठी हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर,चार हत्ती, पाच शार्पशुटर, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचारी एवढ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

काल रात्री टी-१ नरभक्षक वाघीण शोधपथकाच्या नजरेस पडल्यानंतर तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र ती पथकाच्या दिशेने येताच शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे आहेत. त्यांनाही शोधण्यासाठी आता वन विभागाकडून पर्यटन केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

News Desk

राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोधी तर दोन जागांसाठी होणार लढत

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna
मुंबई

सकल ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

News Desk

मुंबई | सकल ओबीसी समाज महाराष्ट्रच्या वतीने ओ.बी.सी. समाजाच्या आरक्षणाला विरोध करणा-या बाळासाहेब सराटे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत बाळासाहेब सराटे यांच्या विरोधात शनिवारी दादरच्या स्वामी नारायण मंदीर परिसरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्यातील ओबीसींना दिले गेलेले आरक्षण बेकायदेशीर असून ते त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबादचे मराठा आरक्षण अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्याविरोधात सराटे यांचा सकल ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून निषेध करण्यात आला.

शनिवारी दादर येथील स्वामीनारायण मंदिर परीसरात या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा निषेध करण्यात आला. यावेळी ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा कांचन नाईक यांच्या सह अनेक कार्यकर्ते याठीकाणी उपस्थित होते.

Related posts

गोखले पूल दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपच्या फैरी

News Desk

ऑनलाईन माहिती भरण्याची कामे आऊटसोर्सिंग करा

News Desk

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा! – देवेंद्र फडणवीस

Aprna