HW News Marathi
महाराष्ट्र

वन विभागाकडून नरभक्षक वाघिणीची शिकार

यवतमाळ | अखेर काल (शुक्रवार) रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आता या वाघिणीचा मृतदेह नागपूरमध्ये पाठवण्यात आला आहे. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १३ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नरभक्षक वाघिणीच्या भीतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामे ठप्प झाली होती. गावातील मजुर मजुरी मिळत नाही म्हणून गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले होते. राळेगाव व पांढरकवडा भागात या नरभक्षक वाघिणीची दहशत सर्वाधिक होती. नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठे प्रयत्न सुरू होते. या शोध मोहिमेसाठी हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर,चार हत्ती, पाच शार्पशुटर, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचारी एवढ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

काल रात्री टी-१ नरभक्षक वाघीण शोधपथकाच्या नजरेस पडल्यानंतर तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र ती पथकाच्या दिशेने येताच शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे आहेत. त्यांनाही शोधण्यासाठी आता वन विभागाकडून पर्यटन केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवासास राज्य शासनाची परवानगी…

News Desk

Corona Vaccination लहान मुलांच्या लसीकरणासाठी वर्ष लागणार!

News Desk

नांदेड जिल्ह्यात दोन नूतन पोस्ट ऑफिसला मान्यता 

News Desk