HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात केंद्र सरकार वंचितांच्या पाठिशी उभे, तर राज्य सरकार… !

पुणे | राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाच्या संकटच्या वेळी विरोधक हे सरकारसोबत आहेत. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात केंद्र सरकारही देशातील वंचितांच्या पाठिशी उभे आहे. आणि त्या सर्वांना सर्वतोपरि साह्य केले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या वंचितांच्या समस्यांकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत का, असा सवाल माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारला केला आहे. तावडे यांनी आज (१७ एप्रिल) फेसबुक लाईव्हीद्वारे कोरोना, राज्य सरकारची कामगिरी, वांद्रे प्रकरण अनेक मुद्द्यांवर राज्यातील जनतेशी संवाद साधला.

या वेळी आम्हला राजकारण करायचे नाही. मात्र, राज्य सरकार जिथे कमी पडत असेल तेथे आम्ही बोलले पाहिजे, असे विधान तावडे म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु या सरकारचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचेही तावडे म्हणाले. दरम्यान, तावडे म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्यापद्धतीने दवाखान्यात जावून भेटी देत आहेत. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यासारख्या इतर मंत्र्यांनी देखील स्वत:ची काळजी घेत फिसरले पाहिजे. स्थानिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून केली आहे. सध्याच्या काळात डॉक्टर आणि पोलीस जसेच फिल्डवर फिरत आहेत. तसेच नेत्यांनी त्यांच्या कार्यालयात किंवा घरात न बसता फिल्डवर फिरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगतिले.

तसेच ज्या लोकांना शाळेमध्ये क्वारंटाईन केले गेले आहे. त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसून या ठिकाणी लोकांना क्वारंटाईन का केले?,असे प्रश्न देखील तावडेंनी सरकारला विचारले आहे. तावडेंनी वांद्रे प्रकरणात एका पत्रकाराला झालेली अटक झाली. हा संपूर्ण प्रकार पत्रकारतेच्या स्वातंत्र्यावर घातलेला घाला असून राज्य सरकार हे अभिव्यक्ती स्वतंत्र मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत!- बाळासाहेब थोरात

News Desk

भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!

News Desk

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार; समाजमाध्यमांद्वारे होणार थेट प्रसारण

Aprna