HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये कमाई झाल्याने दिसून आले, त्यामूळे सीआयडी चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडीच सरकार आहे. या सरकारच्या काळात अनेक अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये प्रचंड कमाई झाल्याने दिसून आले. त्यामूळे त्यांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली मलाईदार ठिकाणी मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन प्रचंड पैसा गोळा केला आहे. त्यामूळे त्यांची सीआयडी चौकशी करण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करु नसते असे आदेश दिले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थिगिती उठवली हे आश्चर्यकारक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

मुळात कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू आर्थिक वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते. तर जुलै महिन्यात राज्यातील करोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. तसेच नंतर त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते.

राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे करोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. करोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच करोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, असे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.

कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय घोषीत केला आणि त्याअंतर्गत अनेक निर्बंध लादले. यामध्ये म्हटले होते की, चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल. कोरोनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक आहे, असे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत पंधरा टक्के बदल्या कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच नंतर २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत १० ऑगस्ट केली. हा बदल्यांच्या धोरणातील विलंब आणि गोंधळ असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आणखी काही ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा देण्यासाठी केंद्राकडे मागणी

News Desk

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

News Desk

गृहमंत्रीपद स्विकारताचं दिलीप वळसे-पाटील यांचा मोठा निर्णय…

News Desk