HW News Marathi
देश / विदेश

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?, चंद्रकांत पाटील म्हणाले…

मुंबई। भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पदावरून काढण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगात आहे. यात आता चंद्रकांत पाटील दिल्लीत पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटलांनी मात्र या चर्चांना फेटाळून लावलं आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही.काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बदलीच्या चर्चा फक्त मीडियात

चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावलं आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत येण्याविषयीचं कारण स्पष्ट

दिल्लीत उद्या(९ ऑगस्ट) भाजप खासदारांची महत्वाची भेट होणार आहे. या भेटीचं कारण म्हणजे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत भाजप खासदारांची भेट

भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

भेटीबद्दल मोदी- शहांना सांगू

एकीकडे जिथे भाजप खासदारांच्या गुप्त भेटी होत आहेत, तिथेच दुसरी कडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भेटीघाटी सत्र सुरू आहे. तर काल देखील चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज यांच्यासोबत झालेल्या भेटीतील तपशीलावर चर्चा करणार आहे.

दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि इतर नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. इतक्यात काही संघटनात्मक बदल होतील असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे !

News Desk

Union Budget 2021 | मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी 

News Desk

१०८ रुग्णवाहिकेची सेवा आजपासून बंद

News Desk