HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार गेली ५० वर्षे राजकारणात आहेत मग त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? 

पुणे | मराठा आरक्षणावरुन सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात वादावादी सुरु आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला आहे. “शरद पवार गेली ५० वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी मराठ्यांना का नाही आरक्षण दिले?” असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती मिळाल्याने राज्यात या समाजात प्रचंड असंतोष आहे. विविध संघटनांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ते “एबीपी माझा’शी बोलत होते.

“मराठा आरक्षण भाजप सरकारने दिले होते त्यासाठी कष्ट घेतले होते. या सरकारने काय केले ? पवारसाहेब अध्यादेश काढण्याची जी भाषा करतात त्याचा काय उपयोग होणार आहे. हा अध्यादेश न्यायालयात टिकणार आहे का ? असा सवाल करून पाटील यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. जे पवारसाहेब गेली पन्नास वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याच पक्षांचे सरकार पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर होते त्यावेळी त्यांनी मराठ्यांना का नाही आरक्षण! त्यांचे सरकार सत्तेवर असताना समाजाचा दबाव वाढू लागताच नारायण राणे समितीच्या शिफारशीनुसार घाईघाईत आरक्षण दिले त्यामध्येही अनेक त्रुटी होत्या ते टिकले असते का ? उलट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने मेहनत घेतली. ९० दिवस यावर तयारी करत होतो. यांनी काय केले?” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फीसाठी जर सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, बच्चू कडुंचा शिक्षण संस्थेला इशारा

News Desk

फडणवीसांना अटक करा, रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk

‘राजीनामा सत्र अद्यापही सुरूच’, ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मस्के मुंबईकडे रवाना!

News Desk