HW News Marathi
महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी असलेल्या त्यांची पण चौकशी होणार का?

कोल्हापूर | ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यात जनसहभागही होता. आता राज्य सरकार त्याचीही चौकशी करणार का, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी मुंबईतल्या मेट्रो कारशेडची आरेमधली जागा कांजूरमार्गला नेण्यामागे, स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालायचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

मागच्या सरकारने पाऊसाचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली. याची जर चौकशी करायची असेल तर करा. यामध्ये सरकारबरोबर गावातील जनसहभाग मोठा होता, त्याचीही चौकशी करणार का? धरणे बांधण्यासाठी लागणार भूमीसंपदान करण अवघड होते, म्हणून जलयुक्त शिवार योजना आणली. ०.१७ टक्के टक्के कामाची तपासणी झाली. ९९.४७ टक्के काम चेक झालीच नाही. केवळ राजकीय आकसापोटी असे निर्णय घेतले आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Aprna

तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक कोरोना बाधित होतील असा अंदाज राजेश टोपेंची माहिती!

News Desk

“तुम मुझे कब तक रोकोगे?” -पंकजा मुंडे

News Desk