HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासाठी मातोश्री बाहेर पडावं लागेल – चंद्रकांत पाटील

लातूर | मुंबईत ७ डिसेंबरला नागपूरात हिवाळी अधिवेशन होणार होते. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आधी मातोश्रीबाहेर पडावं लागेल. त्यामुळेच हे अधिवेशन मुंबईत घेतलं जात आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटील लातूरमध्य़े पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. याच मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे. “राज्यात लहान, गतिमंद, मतिमंद मुलींवरील अत्याचारांत वाढ होतेय. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मागील 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होते. मात्र, राज्य सरकार हे अधिवेशन मुंबईला भरवण्याच्या विचारात आहे.” असे ते म्हणाले. तसेच, नागपुरात अधिवेशन घ्यायचे म्हटल्यावर मातोश्रीतून बाहेर पडावे लागेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नाव न घेता लगावला.

तसेच, मी या आधीच सांगितलं होतं. सरकार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेणार नाही. त्याविषयी कामकाज सल्ल्लाागार समितीची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, भाजप नेते गिरीश महाजन आदी भाजप नेते उपस्थित आहेत. यावेळचे हिवाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मुंबईत होणारे अधिवेशन कमीत कमी १५ दिवसांचे तरी असावे अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. तसेच नागपुरातील अधिवेशन हा एक करार आहे. एक कायदा आहे. त्यामुळे डिसेंबरमधील अधिवेशन नागपुरात होणार नसेल तर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपुरात घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात गेल्या २४ तासांत ३२,९३७ नवे करोनाबाधित, सर्वाधिक केरळमधून!

News Desk

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा! – मुख्यमंत्री

Aprna

विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत सरकारने १ वर्ष पुर्ण केले!

News Desk