HW News Marathi
महाराष्ट्र

विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या

लातूर | मराठा आरक्षण, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, कोरोना प्रसारामुळे आर्थिक संकटात सापडलेले बारा बलुतेदार अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे १५ दिवसांचे अधिवेशन घ्या अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केली. लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की, राज्यकर्त्यांना घरातून बाहेर पडण्याचे धाडस नसल्याने विधीमंडळाचे अधिवेशन नागपूरमध्ये सरकार घेणार नाही हे निश्चित होते . अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान , महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत झालेली वाढ , गतीमंद – मतीमंद मुलींवरील अत्याचार ,मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी १५ दिवसांचे अधिवेशन घेणे गरजेचे आहे.

मध्यंतरी घेतलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विरोधकांकडून होणारी टीका ऐकावी लागू नये म्हणून वेगवेगळया क्लुप्त्या सत्ताधारी पक्षाने लढवल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात अडथळे आणायचे आणि सभागृह कामकाज अर्धा अर्धा तास तहकूब करायचे असल्या खेळ्या सत्ताधाऱ्यांनी केल्या. परिणामी राज्यापुढील अनेक प्रश्नांवर विधिमंडळात गांभीर्याने चर्चाच होऊ शकली नाही.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान , कोरोना काळात सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झालेले मृत्यू यासारख्या मुद्द्यांवरून सरकार पळ काढत आहे. राज्यापुढे असलेल्या विविध प्रश्नांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आम्ही जोरदार संघर्ष करणार आहोत. हिवाळी अधिवेशन होणार नसल्याने नागपूर येथे मार्चमध्ये विधीमंडळ अधिवेशन घ्या आणि नागपूर अधिवेशनाला कायदेशीर स्वरूप द्या, असेही पाटील यांनी नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘म्हणूनच मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, आदित्य शिरोडकरांनी सांगितलं कारण

News Desk

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

News Desk