HW News Marathi
महाराष्ट्र

संतांच्या भूमीत वारकऱ्यांवर अन्याय – चंद्रकांत पाटील

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळा वेगळ्या पद्धतीने विठुरायाच्या चरणी पोहचवण्यात आला. लाखो भाविकांच्या जोडीने नाही तर एस.टी तून काही वारकऱ्यांच्या सोबतीने या पालख्या पंढरपूरला नेण्यात आल्या. मात्र, राजकीय वर्तुळातून ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला जात आहे. भाजपकडून वारकऱ्यांवर अन्याय केल्याचे म्हटले जात आहे.

भाजप आमदार आणि विरोधी पक्ष नेते चंद्रकांत पाटील यांनी संतांच्या या भूमीत संतावर अन्याय होत असल्याचे ट्विट केले आहे. यात त्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यावर्षी बसने पालखी नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सोबत २० वारकर्‍यांना जाण्याची परवानगी दिली. मोठ्या मनाच्या वारकऱ्यांनी सर्वांच्या हितासाठी हे मान्य देखील केले.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना कडून राज्य सरकारने विशेष बसच्या नावाखाली तब्बल ७० हजार रुपये घेतले वास्तविक संतांच्या भूमीत हे विनामूल्य करणे राज्य सरकारचे कर्तव्य होते. परंतु विनामूल्य तर राहिले बाजूला यांनी नाशिक ते पंढरपूर या प्रवासाचे वीस वारकर्यांना कडून ७० हजार रुपये घेणे हे नेमके कोणते गणित आहे. इतर धर्मातील लोकांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी सरकारकडून नेहमीच आर्थिक सहाय्य केले जाते त्यात काही गैर नाही परंतु मग हिंदू धर्मातील परंपरा सोबत हा अन्याय का? आणि तेदेखील महाराष्ट्रात असं घडावं यासारखे दुर्दैव नाही.

मुख्यमंत्री तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला ज्या धर्माने इथवर येऊन पोहोचवलं त्याची ही अशी परतफेड केलीत?वारकऱ्यांना माऊली पर्यंत पोहोचण्याच्या इच्छेचा राज्यसरकारने बाजार मांडला आहे, अशा परखड शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राग व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

News Desk

आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार ?

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

News Desk