HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांचे दावे म्हणजे फक्त बोलण्याच्या गोष्टी !

मुंबई | “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील”, असा दावा नुकताच भाजप नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ह्या सर्व फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. असे काहीही होणार नाही”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर देखील सडकून टीका केली आहे. “लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचाच आत्मविश्वास खचलेला असताना कनिष्ठांनी काम कसे करायचे ?”, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“चंद्रकांत पाटील यांनी केलेले सर्व दावे या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. असे काहीही होणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार राजीनामा देणार नाही. चंद्रकांतदादा ‘अबकी बार २२० पार’ असा दावा करत असले तरीही या केवळ बोलण्याच्या गोष्टी झाल्या. तसे काहीही होणार नाही”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शनिवारी (१३ जुलै) महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी “राज्यात पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल. आम्ही सर्व नेते एकदिलाने काम करून येत्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत तर रॉकस्टार!

News Desk

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीवर राष्ट्रवादीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

‘सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस,’ कोयनेच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर, मुश्रीफांची माहिती!

News Desk