HW News Marathi
महाराष्ट्र

“इतरांप्रमाणे आमदारांना घरे मिळत असतील तर…” – छगन भुजबळ

नाशिक | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आमदारांसाठी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. मात्र, यानंतर आमदारांना घरे देण्याच्या मुद्यावरून अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीतील काही नेते सुद्धा या निर्णयाशी असहमत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले की इतरांप्रमाणे पैसे देऊन ज्या आमदारांना घरं नाहीत, अशा आमदारांना पैसे देऊन जर घर मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचं कोणतंही कारण नाही, असं भुजबळ म्हणाले. तसेच ते म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असो किंवा मग विरोधी पक्षांचे नेते ते सर्वांनाच योग्य मान देतात. त्यामुळे विखे यांना तिकडे मान आहे की नाही याबाबत मला काही माहीत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी सुमारे ३०० घरं बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयावर सामान्य जनता असेल किंवा मग सोशल मीडियावर सुद्धा या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, “आत्तापर्यंत मुंबई शहरामध्ये पोलीस, आयएसओ ऑफिसर आणि वेगवेगळे कलाकार या सगळ्यांना हाउसिंग सोसायटीमध्ये जागा देऊन त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधकाम करून ते मुंबईत स्थायिक झाले आहेत. ज्याप्रमाणे आपण इतरांना घरे देत आहोत त्याच प्रमाणे आमदारांना सुद्धा सोसायटी किंवा इमारत करून देतील. मात्र, यासाठी आमदारांना इतरांप्रमाणे जो खर्च येणार आहे तो द्यावा लागणार आहे. तसेच ज्या आमदारांना घरे नसतील अशा आमदारांना जिथे घरे मिळत असेल तिथे पैसे देऊन घरं मिळत असतील तर काहीच हरकत नसावी. त्यामुळे इतरांनी याबद्दल विरोध करण्याचे काही कारण दिसत नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नवरा-बायको प्रमाणे आहेत. तर काँग्रेस हे वराडी आहेत, अशी खोचक टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती. यावरही भुजबळांनी भाष्य केलं आहे. सुजय विखेंच्या टीकेवर बोलताना भुजबळ म्हणाले की, “सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्र्याच्या शिवाय होत नाही. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्यामुले काही दिवस त्यांना दूर राहावे लागले. पण तरीही त्यांचे अधिकारी त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन काम करत होते. काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान दिला जातो. विखे यांना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नाही. पण आमच्याकडे होते त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते, असे भुजबळ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार म्हणतात…!

News Desk

‘त्या’ ८० हजार फेक अकाऊंटचे मालक कोण? फेसबुक आणि ट्वीटरने जाहीर करावे !

News Desk

सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल !

News Desk