HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई | पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून मोठी दुर्घटना घटना घडली. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेला जबाबदार कोण यावरुन आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मंजुरांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

कोंढव्यातील दुर्घटना दुःखदायक असून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत त्यासाठी मी प्रार्थना करत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्वीट केले आहे. कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापौर मुक्ता टिळक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याभरात आजपासून प्लास्टिक बंदी

News Desk

कोरोना संसर्गविरोधात कोथरूडमध्ये निर्जंतुकीकरणचा चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

swarit

सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र घडेल! – मुख्यमंत्री

Aprna