HW News Marathi
महाराष्ट्र

निरा डाव्या कालव्याबाबत काय म्हणतात… रणजिंतसिंह मोहिते पाटील

मुंबई | नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. सरकारने वस्तुस्थिती पाहून हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार रणजिंतसिंह मोहिते-पाटील एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे. पुढे मोहिते पाटील म्हणाले कि, “जरी बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यासाठी ६० टक्के पाणी वळवून घेतले असले. तरीही इंदापूर या तालुक्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळाले का ?”, असा सवाल देखील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वस्तुस्थिती पाहून हा ऐतिहासिक निर्णय घेतला !

३ एप्रिल २०१७ रोजी करार संपल्यानंतर धरणाचे ६० टक्के पाणी बारामती आणि इंदारपूरला का दिले जात होते. हे नक्की सांगता येणार नाही, याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतु माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा लावून धरला होता. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वस्तुस्थिती पाहून हा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मोहिते-पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

इंदापूर या तालुक्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळाले का ?

मोहिते पाटील पुढे असे देखील म्हणाले की, ६० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यात देण्यात आले. त्याचप्रमाणे सरकारने हा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने घेतला नाही, असे देखील मोहिते पाटील यांनी एच. डब्ल्युशी बोलताना स्पष्ट केले. जरी बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यासाठी ६० टक्के पाणी वळवून घेतले असले. तरीही इंदापूर या तालुक्याला खऱ्या अर्थाने पाणी मिळाले का ?, असा सवाल देखील रणजितसिंग मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.

हा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दणका असल्याचे मानले जात आहे. माढ्याचे नवनिर्वाचिक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पाठपुरावा हा निर्णय घेण्यात आला आहे. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. रणजितसिंह यांनी बुधवारी (१२ जून) सायंकाळी नीरा देवधरचे राखीव पाण्याचे वितरण असलेल्या वीर धरणातून फलटण व माढ्याच्या दिशेने पाणी सोडून त्याचे पूजन केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

राज्यसरकाचा पाठिंबा काढणार शिवसेना

News Desk

कृत्रिम तलावांमधील ‘श्रीं’च्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद, ठाणे शहरात दीड दिवसांच्या 8979 गणेशमूर्तींचे विसर्जन

News Desk