HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री म्हणतात फेरीवाल्यांना हटवायलाच हवं !

मुंबई- फेरीवाला हटाव मोहीमेवरून मुंबईत वाद सुरू असताना या प्रकरणी गप्प असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपले मौन सोडले आहे. फेरीवाल्यांचा प्रश्न हा गंभिर आहेच त्यांना हटवायला हवं यात दुमत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त करत मनसेच्या मोहीमेला अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला. मात्र फेरीवाल्यांच्या वादाला मराठी व अमराठीचे रूप देणे योग्य ठरणार नाही.

यातून काही नेते स्वताची राजकीय पोळी भाजू पहात आहेत ही बाब चुकीची असल्याचं सांगितले. अवैध फेरीवाल्यांना हटवण्याचे काम हे सरकारचे आहे. अशा अनधिकृत फेरीवाल्यांना आम्ही हटवूच असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी फेरीवाले हटवण्याचे श्रेय मनसेला जाणार नाही याची काळजीही मुख्यमंत्र्यांनी घेतली. जे फेरीवाले हटवले गेले आहेत ते कोणत्याही संघटनेने अजिबात हटवलेले नाहीत. त्यांना सरकारच्या संयुक्त टीमने हटवले आहे. असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी आता फेरीवाले हटाव मोहीमेच्या वादात उडी घेतली आहे. फेरीवाला धोरण मंजूर करुन नियमही बनवले असून, मुंबई महापालिकेकडून त्याची अंलबजावणी सुरु आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एका खाजगी वृत्त वाहीनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाच्या बाबी

swarit

अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता!

News Desk

 ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडली आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, मनसेचा मुख्यमंत्र्यावर घणाघात

News Desk