HW News Marathi
Covid-19

यूपीमधील साधूंच्या हत्येच्या घटनांना धार्मिक रंग देऊ नये, उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई | महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोन साधुंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभरात यांचे पडसाद उमटले होते. पालघर घटनेवर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. पालघर हत्याकांडानंतर आता उत्तर प्रदेशातील दोन साधुंची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली, अशी माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली

मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, “मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो,” पालघर घटनेवरुन सरकारवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

पालघर हत्याकांडादरम्यान योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पालघरमध्ये दोन सांधुची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही. तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते.

नेमके काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. काल (२७ एप्रिल) रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. आज (२८ एप्रिल) सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : तेलंगणा राज्याचा लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवण्यात आला

News Desk

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही”, रोहित पवारांची टीका

News Desk

नुकत्याच ‘कोरोना’मुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

News Desk