HW News Marathi
महाराष्ट्र

खूशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा

मुंबई | ठाकरे सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज (१२ फेब्रुवारी) बैठकीत ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय महत्त्वाच निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारच्या पाच दिवसांचा आठवडा करण्याचीअंबलबजावणी २९ फेब्रुवारीपासून होणार आहे. मागील अनेक वर्षापासून केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ५ दिवसाचा आठवडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर सरकारी कर्मचाऱ्या ही मागणी पूर्ण झाली आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा परिणाम सरकारी कामकाजावर होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवारांनी पाच दिवसाच्या आठवड्याला प्रस्तावास विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्याच्या परिस्थितीत असलेला ६ दिवसांचा आठवडा पध्दत कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या धर्तीवर सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पाच दिवसाचा आठवडा करण्याचे निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी अखेर बुधवारी (१२ फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा २९ फेब्रुवारीला लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

आज मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय

१. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ५ दिवसांचा आठवडा. २९ फेब्रुवारीपासून यांची अंमबलबजावणी होणारआहे

२. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता ” “बहुजन कल्याण विभाग”

३. बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. २ कोटींची तरतूद

४.राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड यांनी राजीनामा सोपवला हे वृत्त चुकीचे – संजय राऊत

News Desk

जर आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

News Desk

सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येवर अमृता फडणवीस आणि युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात ट्विटर वॉर

News Desk