HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांवर स्पष्टीकरण

मुंबई | “लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या,” असे ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत आज (१२ जून) स्पष्टीकरण दिले आहे.

सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी १० जून रोजी मंत्र्यालयातील पत्रकार परिषदेत केले होते. यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत राज्यातील जनतेला लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असे म्हणत आश्वस्त केले.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका, सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील, त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी सरकारला आर्थिक घडी सावरण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

News Desk

पुण्यात आज नवे २७५ कोरोनाबाधित रुग्ण

News Desk

काही लोकांना हौस असते आंदोलन करण्याची ! अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

News Desk