HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद

मुंबई | काय ताई, काय दादा, जेवायला सुरुवात केली का?, जेवणाबाबत समाधानी आहात ना, जेवण ठीक आहे का?, चव व्यवस्थित आहे ना, जेवण आवडले की नाही… काही सुचना असल्या तर मनमोकळेपणाने सांगा, अशी विचारणा करतांना जर राज्याचा प्रमुख सावकाश जेवण्याचा आग्रह करत असेल तर त्याहून मोठी गोष्ट कोणती ?

प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेचा राज्यात शुभारंभ झाल्यानंतर काल (२८ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर आणि नंदूरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. तेंव्हा हाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत होता. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साहेब एरवी जेवायला ५० रुपये लागायचे आता दहा रुपयात जेवण होते… तुम्ही शिवभोजन थाळी सुरु करून आमच्यासाठी खूप चांगली सोय केली बघा, नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी जेवता जेवता आपली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना सांगितली. थेट आमच्याशी बोलून आमची चौकशी करत असल्याबद्दलचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले, केंद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला.

सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर दुपारची जेवणाची चांगली सोय झाल्याचे कोल्हापूरकरांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी रुद्राक्षी स्वंय महिला बचतगटाच्या अण्णा रेस्टारंटच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशी तसेच त्यांनी सुरु केलेल्या शिवभोजन केंद्रातील लोकांशी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी रवाना

News Desk

देवेंद्र फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडले, कॉंग्रेसची जहरी टीका

News Desk

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

News Desk