HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते?”, नितेश राणेंचा सवाल   

मुंबई | वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर आज (१५ मार्च) निलंबित करण्यात आले आहे. अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन यांची हत्या या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोडीत पकडले आहे. यानवरुनच भाजपचे नेते नितेश राणे यानी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर सडकडून टीका केली.

सचिन वाझे प्रकरणावरून आज पत्रकारपरिषदेत बोलतान भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. नितेश राणे म्हणाले, आता जो काही राज्यासमोर विषय गाजतो आहे, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात. सामनाच्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे.

सचिन वाझेची कशी चूक नाही, हे जेव्हा वकिली करण्यासाठी पुढं येतात, तेव्हा त्याच्या मागची काही कारणं आहेत. नेमकं त्याचीच वकिली यांना का करावी लागते? काय आहे असं या सचिन वाझेकडे? ज्यामुळे यांना हे सगळं पणास लावावं असं वाटतं. तर त्याचे काही विषय माझ्यासमोर आहे. या विषयावर आपल्याला थेट कळेल, की नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक साधा एपीआय सचिन वाझेची वकिली नेमकी आज का करत आहेत? याबाबत काही विषय मला आपल्यासमोर मांडायचे आहेत. मागील वर्षी आयपीएलची मालिका आपल्य इथं खेळली गेली, साधरण सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आय़पीएलच्या अगोदर, आयपीएलच्या नावाखाली जे काही विषय सुरू होते, ते या प्रकरणाशी कसे निगडीत आहे, ही माहिती मी सर्वांसमोर मांडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

Aprna

येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

Gauri Tilekar

नोकरी नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk