HW News Marathi
देश / विदेश

शपथविधीसाठी स्पष्ट नियमावली ठरवावी, राज्यपालांचे व्यंकय्या नायडूंना पत्र

मुंबई | राज्यसभा खासदारांच्या नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले खासदारकीची शपथ घेत असताना घडलेल्या प्रकारामुळे राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पत्राद्वारे एक मागणी केली आहे. शपथविधीसाठी एक नियमावली ठरवून देण्याची मागणी राज्यपालांनी या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. “शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र पत्र पाठवून केली आहे”, अशी माहिती ट्विटद्वारे देण्यात आली आहे.

“नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात, यामुळे शपथविधीचे गांभीर्य कमी होते असे राज्यपालांनी पत्रामद्धे नमूद केले आहे”, अशीही माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, उदयनराजेंनी इंग्रजी राज्यसभा खासदारकीची शपथ घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडूंनी त्यांना समज दिली. मात्र, यामुळे राजकारण पेटले.

व्यंकय्या नायडू उदयनराजेंना काय म्हणाले ?

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू म्हणाले कि, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत नाही तर माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात अशा कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. तुम्ही नवीन सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यात हे लक्षात ठेवावे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुरामधील कम्युनिस्टांचे सरकार उलथवून टाका –  रामदास आठवले

swarit

“स्फोटक प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे ?”, वकील असीम सरोदेंचा सवाल

News Desk

कोरोनाच्या परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे भाजपची नाव न घेता तक्रार

News Desk