HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. देशात रोज १ लाखांच्या पुढे आता रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही रोज ५० ते ६० हजारांच्या मध्ये नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच, देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईतही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ल़ॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊन बाबत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसेच, मुंबईत बाहेरुन येणाऱ्या लोकांवर काही निर्बंध लावले जाऊ शकतात असंही शेख म्हणाले आहेत. तसेच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार आजच निर्णय जाहीर करेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. तसेच, देशातील वाढत्या कोरोना संख्यांवर बोलताना ते म्हणाले की, कुंभमेळ्यामुळे देशात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे लवकर यावर आळा घालणे गरजेचे आहे, असेही मत असल्म शेख यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या टास्क फोर्समधील काही जणांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. काही जणांनी एवढ्या लॉकडाऊनमुळे त्रास होईल असे म्हटले होते. काही जणांनी १४ दिवसांच्या तर काही जणांनी ८ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करावी असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहोचले जात आहे. मात्र काही राज्ये कोरोनाचे रुग्ण लपवत आहेत. त्यांच्याकडे १५ दिवसांनंतर बिकट परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार स्थिर, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या पाठिंशी उभे !

News Desk

पतंजलीच्या ‘कोरोनील’मुळे रामदेव बाबांसह अन्य ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

राजेश टोपे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश, मंठातील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा

News Desk