HW News Marathi
महाराष्ट्र

“४० दिवसांत मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागेल”

नाशिक | राज्यात सध्या अनेक विषयांवरुन राजकारण तापलं आहे. अनिल देशमुख यांचं प्रकरण असो किंवा मग या आधाचं संजय राठोड यांचं प्रकरण असो राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचं पातक फेडावं लागेल. अनिल देशमुख यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता येत्या ४० दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, असं वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं आहे. दरम्यान, या आधीही आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले होते.

अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरु झाली आहे. ४० दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान पुढील १५ दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल असा दावा त्यांनी केला. “पुढील १५ दिवसांत अजून दोन मंत्री राजीनामे देतील. मला नावं विचारु नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल,” असं ते म्हणाले होते. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचेही नाव लिहिले होते. यावरुनच चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधत सूचक वक्तव्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जातधर्मापलीकडे जाऊन कनक्यात साजरी झाली भाऊबीज

News Desk

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार- संजय राऊत

News Desk

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

News Desk