HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांना शक्य असल्यास चहा, जेवण द्या, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचं नागरिकांना भावनिक आवाहन

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.

“कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, याबाबत सगळी लोकांना माहिती दिलेली आहे. नागरिकांनी पोलिसांना शक्य तितकं सहकार्य करावं. त्यांनी पोलिसांना शक्य असल्यास जेवणही द्यावं, असं केल्यास आपली आपुलकी समोर येईल,” असं हेमंत नगराळे म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे.

नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे

राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मागच्या वेळीपेक्षा हा लॉकडाऊन थोडा वेगळा आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे. रस्त्यावर कोणी यावे कोणी नाही, ह्याबाबत सूचना दिली गेली आहे. कोरोना यंदा भयंकर आहे.

जे दिलेल्या सूचना पाळत नाही, उगाच बाहेर येत आहेत ते योग्य नाही. पोलीस सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत. मागील वेळी ८००० पोलीस संक्रमित होते, आज ५४१ संक्रमित आहेत. एकूण १०२ पोलिसांचा जीव गेल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्या लोकांनी करू नये, काय करायचं आणि काय नाही करायचं हे लोकांना सांगितलेलं आहे. पोलिसांना शक्य तेवढी सगळी मदत करा, असं माझं जनतेला आवाहन आहे. चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही त्यांना द्या. त्याच्याकडे नाही असं नाही, पण आपली आपुलकी समोर येईल.

कोणीही कडक पावलं उचलण्याची वेळ आणू नये,

जर कोणाला समजत नसेल तर वेगळं पाऊल उचलावं लागेल. पोलिसांना जर कोणी शिव्या देत असेल ते योग्य नाही, असं कोणीही करू नये, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

तसेच, ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना कार्यालयीन कामदेण्यात आले

कोरोना रूग्ण संख्या वाढत आहेत. गेल्या वर्षी ५० किंवा ५५ वर्षांच्या पोलिसांना सुट्टी दिली गेली होती. मात्र यावर्षी कोरोना जास्त वाढता आहे. म्हणून जास्त लोकांची गरज आहे. तरी देखील आम्ही ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना कार्यालयीन काम दिलं आहे, असंही मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

तसेच, स्टेशनवर होणाऱ्या गर्दी बाबत नगराळे म्हणाले की, आम्ही रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहोत. स्टेशनवर गर्दी जास्त होतेय, त्यासाठी आम्ही रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय.अतिरिक्त पोलिस स्टाफ उपलब्ध करून दिला आहे. लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. कुठलाही मेसेज खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये, असंही मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती!

News Desk

पंढरपूरची यात्रा ‘ही’ सर्वात प्राचीन यात्रा, मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

Gauri Tilekar

बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna