HW News Marathi
Covid-19

केंद्र आणि राज्य सरकारांनी जागे व्हावे ! सोनिया गांधींचा सल्ला

नवी दिल्ली ।“देशातील कोरोनाच्या या संकटकाळामध्ये आपण एकमेकांचा हात पकडून पुढे गेले पाहिजे”, असा सल्ला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे, “देशातील भीषण कोरोनास्थिती निर्माण झाली असून आता केंद्र आणि राज्य सरकारांनी जागे व्हावे”, असाही सल्ला यावेळी सोनिया गांधी यांनी दिला आहे.

सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या की, “कोरोना महामारीच्या संकटात तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावला त्या लाखो कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात पकडून पुढे गेलं पाहिजे.”सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओद्वारे लोकांना हे आवाहन केले आहे.

सोनिया गांधी यांनी यावेळी देशातील केंद्र आणि राज्य सरकारांना उद्देशून आवाहन करताना म्हटले आहे की, “केंद्र आणि राज्य सरकारांनी आता जागे व्हावे. आपले कर्तव्य पार पाडावे.” तसेच पुढे काही महत्त्वाच्या मागण्या करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, “सरकारने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करावी, ऑक्सिजन, औषधांचा पुरवठा देखील युद्ध पातळीवर करावा, मोफत लसीकरणाची व्यवस्था करा, कोरोना लसीच्या किंमतींमधला फरक दूर करावा, गरिबांच्या खात्यामध्ये किमान 6 हजार रुपये जमा करावेत, नागरिकांचे स्थलांतर थांबवावं.” ,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या ८०६८ वर

News Desk

केंद्राला लसीचा तुटवडा माहित असूनही लसीकरणाची घोषणा करून टाकली, सीरमचा मोठा दावा

News Desk

वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज! – मुख्यमंत्री

News Desk