HW News Marathi
महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी अमित देशमुख यांच्यासह सतेज पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

मुंबई | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाहीत. अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सध्या राज्यभर सुरू आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुखतीत महाविकासआघाडीवर आरोप केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वीच नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची अंतर्गत खलबत्ते सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात बंद दाराआड जळपास एक तास चर्चा झाली. या चर्चेनंतर हे तिन्ही नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. यामुळे आज (१५ जून) काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या (१६ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चे काय निर्णय घेण्यात येईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील या तिन्ही नेत्यांच्यात बंद दाराआड जळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीसाठी अमित देशमुख आणि सतेज पाटील हे दोघेही आज दुपारी ४ च्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या दोन मंत्र्यांचे स्वागत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवसस्थानी अमित देशमुख आणि सतेज बंटी पाटील या तिघांच्यात सुमारे एक तास बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील जरी समजू शकला नसला, तरी महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असून काँग्रेसला निर्णय प्रक्रीयेत घेताना दुय्यम स्थान दिले जात आहे. यावर चर्चा झाली असावी, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा वाटा होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया स्वतः पार पाडली. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवू शकले. सरकार जरी महाविकास आघाडीचे आले तरी पृथ्वीराज चव्हाण सरकारीमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यांनी बाहेर राहून पक्षाचे व्यासपीठ भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळा रंगू लागल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेचे चंद्रपुरातील आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा

News Desk

भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान मनसेचा नवीन झेंडा फडकला

swarit

शरद पवारांवरील शस्त्रक्रिया पुर्ण, प्रकृती स्थिर

News Desk