HW News Marathi
देश / विदेश

गोपीनाथ मुंडेंच्या कन्येचे ‘हे’ विधान दुर्देवी आणि केविलवाणे !

मुंबई । राज्याचे पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला होता. त्यावर, सुनील केदार म्हणाले की, “लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनी याचे हे विधान दुर्देवी आहे.”

पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी व्यक्त करत सुनील केदार म्हणाले की, “राजकारणासाठी, मतांसाठी राजकारण जरूर करा. पण सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नांवर बोलताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने अत्यंत केविलवाणे वक्तव्य करावे हे दुर्दैवी आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना महाराष्ट्र मुक्त करण्यात आले हे काय कमी आहे का?” असा टोलाही यावेळी सुनील केदार यांनी भाजपला लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये बोलताना म्हणाल्या होत्या की, ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय घ्या.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल

News Desk

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

सलग १३व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

swarit