HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती-सामना

मुंबई | महाराष्ट्राचं राजकारण कोरोनाच्या काळातही चालु असल्याने आता कोणतं नविन वळण लागेल यावर कालच्या दिवसात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. काॅंग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आणि शिवसेना ,राष्ट्रवादीकडून काँग्रेसची मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. काॅंग्रेसच्या हट्टापायी निवडणुक लागणार हे चित्र निर्माण झाल्याने भाजपनेसुद्धा महाविकासआघाडी कोरोनाच्या काळातदेखील राजकारण करतेय असा ठपका ठेवला. मात्र काल अखेर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला आणि सगळ्यांनी निवडणुका होणार नाहीत म्हणून सुचकेचा निःश्वास सोडला.

मात्र या सगळ्या प्रकरणावर आज सामना अग्रलेखात काँग्रेसचे आभारही मानण्यात आले आहेत आणि एक मुद्दा ही उपस्थित करण्यात आला आहे. सामनामध्ये म्हणण्यात आले आहे की , ‘काँग्रेसकडून सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकार्‍याला संधी मिळेल असे वाटत होते. विदर्भाचे अतुल लोंढे यांचेही नाव चर्चेत होते, पण कोणास फारसे माहीत नसलेले राजेश राठोड व पापा मोदी ही मराठवाड्यातील नावे समोर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीच्या ‘पेल्यात’ थोडा खळखळाट झाला. मात्र आता काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे’ त्यामुळे काॅंग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती असे सामनामध्ये शिवसेनेकडून स्पष्ट मत मांडण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Aprna

आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही! – संजय राऊत

News Desk

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

Aprna