HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! देशात ४४,१११ नवे रुग्ण आढळले, कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही वाढली संख्या

नवी दिल्ली । संपूर्ण जगात आणि देशात गेलं दीड वर्ष कोरोनाचं संकट घोंघावत आहे. महाराष्ट्रमध्ये देखील कोरोनची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे . हा आठवडा दिलासादायक ठरला आहे कारण रुग्णांची आणि मृतांची संख्या बऱ्या पैकी कमी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४४,१११ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ५७,४७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासांत ८७५३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन ८३८५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५८,३६,९२० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,१६,८६७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.०१% झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

थोडी माणुसकी असायला हवी होती, अजित पवारांची व्हेंटिलेटर्सच्या प्रश्नावर खंत

News Desk

अमित देशमुख यांनी या कारणासाठी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

आमच्या जीवाला काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे जबाबदार !

News Desk