HW News Marathi
देश / विदेश

‘कोरोना’बाधिताच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील तब्बल २० जणांना क्वारंटाईन

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा आपल्यासाठी आता अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच आता पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या औरंगाबादमधील तब्बल २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या २० जणांपैकी ११ जण हे गंगापूरचे तर ९ जर परभणीतले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता या भागात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील संबंधित कोरोनाबाधित रुग्ण हा मूळचा गंगाखेड तालुक्याचा राहणार असून तो कामानिमित्त पुण्यात राहत होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तयनानंतर २२ मार्च त्याचे रिपोर्ट्स कोरोना पॉझिटिव्ह आले.

पुण्यातील २२ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळेल हा व्यक्तीने मात्र १३ ते १५ मार्चदरम्यान औरंगाबादमधील पैठण येथील नाथशष्टी यात्रेत सहभाग घेतला होता. यावेळी गंगाखेड तालुक्यातील रहिवासी असलेले आणि त्याचेच नातेवाईक असेलेले हे ११ जण त्याच्या संपर्कात आले. त्यानंतर आता या ११ जणांचे स्व्याब सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. त्याचप्रमाणे हे ११ आणि परभणीतील ९ जण सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. यासह दिल्लीतील मरकजला जाऊन आलेल्यांच्या आलेला एक जणसुद्धा सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन

News Desk

विरोध पक्षांकडून भारतीय सैन्याचा वारंवार अपमान केला जात आहे !

News Desk

#Lockdown : नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे

News Desk