HW News Marathi
महाराष्ट्र

लासलगाव जळीत कांड : पीडितेला उपचारासाठी मुंबईत हलवले

नाशिक। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळून तिची हत्या करण्यात आल्याची घटनेला अवघ्या काही दिवस उलटून गेले असताना, नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती झाली. लासलगावमध्ये बसस्थानकाजवळ शनिवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास एका महिलेला भरदिवसा पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित महिला ६७ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित अद्याप फरार असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बस स्थानकाजवळ उभी असताना तीन जणांसोबत तिचा काहीतरी वाद झाला. विशेष म्हणजे वादानंतर महिलेने स्वतःच्या गाडीतून यावेळी पेट्रोलचा कॅन काढला आणि संशयितांसोबत झालेल्या झटापटीत पेट्रोलचा भडका उडाला. मात्र, या प्रकरणात आग कुणी लावली याची अद्याप मिळालेली नाही. या घटनेत महिला ६७ टक्के भाजली आहे. घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पळ काढला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यानंतर आता पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मुंबईतील मसीना रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत

महिलेची प्रकृती गंभीर असून ती ६७ टक्के भाजली आहे. गरज पडल्यास तिला मुंबईला हलवल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेल्या दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळातच नाशिकमध्ये शनिवारी मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची भेट घेत तिची विचारपूस केली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शासन झालेच पाहिजे, मात्र सध्या ही महिला वाचणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिलारे गुरुंजींचे निधन

News Desk

भर बैठकीत निधीवरून अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद

News Desk

“पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, निलेश राणेंचा प्रहार

News Desk