HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातून बाहेर पडत राज्यात परतीच्या पावसाने काय झाले आहे हे पाहण्याच्या सल्ला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला होता. त्याला राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत आहे. तसेच एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी ६ वेळा बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

दरम्यान, परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे.

परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडून पडण्याचा सल्ला दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

‘बँकेच्या ठेवीदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्राचं पाऊल…’, केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

“भाजप बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?”, काँग्रेसचा खोचक सवाल

News Desk